🦩 *अस्तित्वाची नोंद* 🦩
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
सज्जन माणसे
राजकारणात पडत नाहीत,
🤦🏽‍♂️ चुकून एखादा या क्षेत्रात गेला तर
त्याला राजकारणी टिकू देत नाहीत आणि
त्याचे समाजकारण चालू देत नाहीत.
_पक्षविरहित आणि राजकारणविरहित सेवा_
_समाजाला अपेक्षित असते._ 🏛️समाजसेवा करणारी माणसे निष्ठेने, प्रामाणिकपणाने हे कार्य करीत असतील, तर त्यांच्या भोवती समाज गोळा होतो.
🏛️समाजाला अशा व्यक्तीकडून
खरोखर अपेक्षा वाटू लागते.
🏛️अशा व्यक्तीच्या भोवती गर्दी जमू लागली,
की राजकारणी लोकांचे पित्त खवळते.
➖ *दु र्ल क्षि त हो णे,*➖
*हे राजकारणातील दारिद्र्य आहे.*
_आपल्यापेक्षा दुसऱ्याला महत्त्व आले, की असे राजकारणी लोक, त्या लोककल्याणकारी व्यक्तिचे, त्याची काहीही चूक नसताना आणि त्याचा कोणताच दोष नसताना शत्रू बनतात._ *हा काळ सज्जन लोकांच्या आणि समाजसेवकांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि कसोटीचा काळ असतो.*
त्यांच्या जीवनातील सत्यवाची परीक्षा
याच काळात होत असते.
⛳विश्व माऊली ज्ञानदेवांना शुद्धिपत्र मागणारे,
⛳ तुकोबारायांची गाथा इंद्रायणीत बुडविणारे,
⛳ नाथ महाराजांच्या अंगावर थुंकणारे
👹👹हेच लोक होते.👹👹
कर्मवीर भाऊराव पाटील यांना
आत्महत्येचा विचार डोक्यात
आणायला कारणीभुत ठररणारे
👹👹हेच लोक होते.👹👹
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई
यांच्या अंगावर शेण टाकणारे,
👹👹हेच लोक होते.👹👹
*याचा अर्थ राजकारण आणि राजकारणी यांच्या तावडीतून कोणाचीही सुटका होत नाही.*
_आपण स्वार्थी बनलो तर_
ते आपल्याला त्यांचा
*अनुयायी किंवा समर्थक* बनवतात.
_आपण निःस्वार्थी वृत्तीने समाजात,_
_समाज सेवा करत राहिलो, तर_
ते आपले *शत्रू* बनतात.
त्यात आपला काहीच दोष नसतो.
✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾✊🏾
ज्याचा स्वतःवर विश्वास असतो, तो या महापुरातही ठामपणे , अढळ उभा राहतो.
त्याचेच चरित्र बनते आणि
जगाला ते दिशा देते.
बाकीचे जन्माला येतात आणि
प्रवाहाबरोबर वाहून जातात.
🦯 यांची नोंद फक्त सरकारी दप्तरी
जन्मल्याची असते आणि शेवटी
💀 मेल्याची असते.
आपण कोणत्या वर्गात उभे राहायचे
हे आपल्याच हातात आहे.
⛳⛳⛳
🦩 *जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती l*
*देह कष्टविती परोपकारे ll*
🦩 *भुतांची दया हे भांडवल संती l*
*आपुली ममता नाही देही ll*

_*डॉ. आसबे ल.म.*_

_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
मो.नं.9822292713.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!