लाडकी बहीण योजनेसाठी पैसे मागणाऱ्या तलाठ्याला दणका;
तलाठ्याचं निलंबन

*👉🟥🟥👉राज्य सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता राज्यात या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला तलाठी कार्यालयासमोर गर्दी केली होती.यादरम्यान मंगळवार दि.२ जुलै रोजी योजनेचे अर्ज भरताना महिलांची आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तर विरोधकांह सत्ताधारी नेत्यांनी यावरून जोरदार टीका केली. यानंतर आता अमरावती जिल्हाधिकारी यांनी पैसे मागणाऱ्या तलाठ्याला दणका दिला असून तलाठ्याचे निलंबन केले आहे.*

*👉🛑🛑👉राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर आता राज्यात महिलांकडून या योजनेसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.महिलांची सकाळपासूनच तलाठी कार्यालयासमोर मोठी गर्दी दिसत आहे.अशीच गर्दी अमरावती येथील वरूड तालुक्यातील सावंगी गावात तलाठी कार्यालयात उसळली. यावेळी तलाठी तुळशीराम कठाळे आणि कर्मचाऱ्यांकडून योजनेचा अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलांकडून ५० रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप गावातील महिलांसह गावकऱ्यांनी केला आहे.*

*👉🛑🛑👉दरम्यान जळगाव जिल्ह्यातही तलाठ्याने महिलांशी हुज्जत घालत अर्ज स्वीकारणे बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जामोद तालुक्यातल्या खेर्डा बुद्रुक येथील तलाठ्याने केला. तसेच कुठेही तक्रार करा, मी तुमचे अर्ज घेणार नाही, म्हणत थेट कार्यालय बंद केले. त्यामुळे प्रशासनातील कर्मचाऱ्यांची मुजोरी समोर आली आहे. यामुळे गावकऱ्यांसह विरोधकांची टीकेची झोड उठल्यानंतर आता अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी कठाळे यांचे निलंबन केले आहे.*

*👉🟥🟥👉आता या योजनेत झाला बदल*
*👉🛑☄️🛑👉‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत आता राज्यसरकारने केले मोठे बदल केले आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ आँगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार*

*मुंबई:-महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयांवरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे.*

*👉🟥🛑🟥👉ज्या महिलांकडे डोमिसाइल म्हणजे अधिवास दाखला नाही त्या महिलेकडे १५ वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एक कागदपत्र असेल तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने १५ जुलै ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती. पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे. याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकणार आहेत.*

*👉🛑🛑👉मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत झालेले बदल पुढीलप्रमाणे:-*

*🔺🛑🔺1). सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.01जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.*

*🔺☄️🔺२). या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1). रेशन कार्ड 2). मतदार ओळखपत्र 3). शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4). जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.*

*🔺🟥🔺३). सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.*

*🔺🛑🔺४). सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.*

*🔺☄️🔺५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.*

*🔺🛑🔺६). रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.*

*🔺🛑🔺७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!