चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष श्री उदय देशपांडे सर यांच्यातर्फे सर्व अपंग विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. तसेच चेतना फाउंडेशनचे सचिव श्री विलास भोसले सर व खजिनदार श्री माने सर यांनी सर्व अपंग विद्यार्थ्यांना अपंगावर मात करून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. तसेच अपंग पुनर्वसन केंद्रासाठी जेवढी मदत लागेल तेवढी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच योग्य असे शिक्षण घेऊन भविष्यात स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन केले.