म्हणून पाया पडायची पध्दत आहे.
चागंली पध्दत‌आहे, पण कलियुगात वाईट घडते?

नमस्काराचे महत्व

● *महाभारताचे युद्ध सुरु होते.*
*दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे*
*मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे*
*ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून*
*देखील त्यांच्या सेनेची सतत हानी*
*होत होती..*

● *एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर*
*व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन*
*भीष्म पितामह घोषणा करतात की..*

● *”मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन..”*

● *त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या*
*शिबिरात पोहोचताच पांडवांची*
*अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या*
*क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..*

● *तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल*
*झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या*
*लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले..*

● *”माझ्या सोबत चल..”*

● *द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण*
*पितामहांच्या कक्षात पोहोचले.*
*ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर*
*उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की,*
*आत जाऊन पितामहांना प्रणाम कर..*

● *सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत*
*जाऊन पितामहांना प्रणाम करताच,*
*”अखंड सौभाग्यवती भव” असा*
*आशीर्वाद त्यांनी तिला दिला..*

● *त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की,*
*”वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी*
*काय आलीस..??”*

● *”माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे*
*आले आहे आणि ते बाहेर थांबले*
*आहेत” असे द्रौपदीने सांगताच*
*श्रीकृष्णाला भेटायला पितामह*
*बाहेर आले आणि त्या दोघांनी*
*एकमेकांना प्रणाम केला..*

● *भीष्म पितामह म्हणाले..*
*”माझ्या एका वचनाला दुसऱ्या*
*वचनाने मात देण्याचे काम फक्त*
*श्रीकृष्णच करु शकतात..”*

● *शिबिरात परतताना श्रीकृष्ण*
*द्रौपदीला म्हणाले की, “बघ,*
*तुझ्या फक्त एक वेळ जाऊन*
*पितामहांना नमस्कार करण्यामुळे*
*तुझ्या पतींना जीवनदान मिळाले,*
*हे तुझ्या लक्षात आले का..??*

● *जर तू दररोज नित्यनेमाने पितामह*
*भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या*
*मान्यवरांना नमस्कार केला असतास*
*आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या*
*पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू*
*पांडवांना नमस्कार केला असता तर*
*हि युद्धाची वेळच आली नसती..*

● *अशी असते नमस्कार*
*आणि आशीर्वादाची शक्ती..!!*

●● *तात्पर्य..*

● *वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या*
*समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच*
*आहे की, कळत नकळत आपल्या*
*हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा*
*केली जाते..*

● *जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या*
*मंडळीना दररोज नमस्कार करुन*
*त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार*
*असतील, तर त्या घराघरात वितंडवाद*
*सहज टाळता येऊ शकतात..*
*असे घर स्वर्ग बनू शकते..*

● *मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे*
*कवच आहे की, ज्याला कुठलेही*
*शस्त्र भेदू शकत नाही..*

● *कारण..*

● *नमस्कारात प्रेम आहे..*
*नमस्कारात विनय आहे..*
*नमस्कारात अनुशासन आहे..*
*नमस्कार आदर शिकवतो..*
*नमस्कारामुळे मनात सुविचार येतात..*
*नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो..*
*नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो..*
*नमस्कारात शीतलता आहे..*
*नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो..*
*नमस्कार आपली संस्कृती आहे..*
*ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे..*

 

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!