⛳⛳⛳⛳⛳⛳
📍 *देवळातील गर्दी* 📍
⛳⛳⛳⛳⛳⛳
कोणात्याही देवळातील गर्दी,
ही सर्व भक्तांचीच असते असे नाही,
🦯 हौसे, 🦯गवसे, 🦯नवसे 🦯खिसेकापू,
🦯चोर, 🦯लुटारू, त्याचबरोबर
भीतीपोटी देवळात आलेले बरेच असतात.
भक्ताची व्याख्या
⛳तुकोबारायांना अशी केलेली आहे,
*भक्त ऐसे जाणा जे देही उदास l*
*गेले अशा पाश निवारोनि ll*
*विषय तो त्यांचा झाला नारायण l*
*नावडे जनधन माता पिता ll*
या भक्ताच्या व्याख्येत बसणारे,
⁉️किती देवळात असतील⁉️
हा संशोधनाचाच विषय आहे.
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
_सगुण-साकार रूपातील मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर,_
_आपला अष्टसात्विक भाव जागृत होऊन,_
_आपला श्रमपरिहार होत असेल,_
_आपला शीण जाऊन उत्साह निर्माण होत असेल_
_तर आपले *दर्शन* सफल झाले असे समजावे._
⛳🦩⛳
*मागील परिहार पुढे नाही शीण l*
*झालिया दर्शन एकवेळ ll*
*वाट पाहे उभा भेटीची आवडी l*
*कृपाळू तातडी उतावीळ ll*
दर्शन झाल्यानंतर हा बदल
आपल्यात होत असेल, तरच
आपले देवदर्शन सफल आहे. _तीर्थयात्रेमध्ये जाऊन आपल्या वृत्तीमध्ये बदल होत नसेल, तर ती वारी ठरत नाही, तर ते पर्यटन ठरते._
*संसारात वृत्ती*
_आसक्त बनत असते_ आणि
*परमार्थात ती*
_विरक्त बनत असते._
*विरक्तीत सुख आहे* आणि
*आसक्तीत दुःख आहे,* म्हणून
_संसारात दुःख आहे,_
_असे सर्वच संत म्हणतात._
⛳🦩⛳
*फलकट तो संसार l येथे सार भगवंत ll*
*ऐसे जागवितो मना l सरसे जनासहीत ll*
असे 🙏🏻शुद्ध भक्त देवळातील गर्दीत
खूप कमी असतात.
👤चोर, लुटेरे, खिसेकापू
यांची संख्याही फारशी नसते.
_मग देवळातील गर्दी ही हौसे, गवसे, नवसे यांच्या बरोबरच स्वतःच्या कर्माला घाबरून आलेली माणसे संख्येने सर्वात जास्त असतात._
आपण जे कर्म करतोय
⁉️ते पाप आहे की पुण्य आहे⁉️
याची खात्री माणसाला नसते,
😓त्यातही केलेल्या कर्माने, आपण पापच केलेले आहे, असे ज्यांना वाटत असते, त्या पापाला घाबरून देवळात गर्दी करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
🤑मंदिरे आणि देवस्थाने श्रीमंत करण्याचे कामही हेच लोक करतात. अशा लोकांकडूनच मंदिरात, आपल्याला सुख लागावे, यासाठी 🤑गैरमार्गाने जमवलेला पैसा दान करून, _सुख शोधण्याचा निष्फळ प्रयत्न_ होत असतो.
*वास्तविक _केलेले पाप हे भोगुनच संपवावे लागते,_ दुसऱ्या कोणत्याही मार्गाने ते संपविता येत नाही.*
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
गुरुकृपा, भगवंतकृपा आणि साधना
यांनी विवेक जागा होतो आणि कोणतेही कर्म पापपुण्य ठरवण्या ऐवजी, _असा साधक कर्म फळाची अपेक्षा सोडून देतो आणि क|र्म|यो|गी बनतो._
अशा कर्मयोग्याला देवळात गर्दी
करण्याची गरज लागत नाही.
*जोपर्यंत देवळात*
*अशा पापी लोकांची गर्दी आहे,*
_*तोपर्यंत मंदिरे श्रीमंत होत राहणार*_
आणि _*देश गरीब होत जाणार.*_
⛳🦩⛳
*देह समर्पिजे देवा l भार काहीच न घ्यावा l*
*होईल अवघा l तुका म्हणे आनंद ll*
*युक्त आहार विहार l नेम इंद्रियासी सार l*
*नसावी वासर l निद्रा बहु भाषण ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल.म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!