सीबीएसई’च्या पॅटर्नप्रमाणेच आता राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात आता १ एप्रिलपासून करण्याच्या तयारीत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या सुकाणू समितीने तशी शिफारस राज्य शासनाला केली आहे.२०२६-२७ पासून त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे, पण तत्पूर्वी शासनाचा अंतिम आदेश काढला जाणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंत पहिला, तिसरी ते पाचवीपर्यंत दुसरा आणि नववी ते बारावीपर्यंत तिसरा टप्पा करण्यात आला आहे. इयत्ता नववीपासून विद्यार्थ्यांना एक स्थानिक भाषा व दुसरी देशातील कोणतीही किंवा परदेशी एक भाषा निवडता येईल. विषयांची मर्यादा कमी होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहेत.
दरम्यान, सध्या ‘सीबीएसई’च्या शाळांचे शैक्षणिक वर्ष ३१ मार्चला संपून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १ एप्रिलपासून होते. त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला वेळ मिळणार असून अध्यापनाच्या तासांची वेळ देखील काही मिनिटांनी वाढविता येणार आहे. ‘सीबीएसई’कडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने आता राज्य शासन देखील गणित व विज्ञान हे दोन विषय ‘सीबीएसई’प्रमाणेच ठेवणार आहे. यासाठी राज्याच्या सुकाणू समितीने मान्यता दिली असून आता याची
