लॉकडाऊन केल्यास कोट्यवधींचं नुकसान, पुन्हा चूक करणार नाही तेलंगणा चे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव*

*हैदराबाद:-जगासह देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आटोक्यात आल्यासारखी वाटणारी कोरोना रुग्णसंख्या मार्च महिन्यापासून पुन्हा वाढू लागली. त्यामुळे चिंता वाढू लागली असून देशात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही राज्यांमध्ये विशेषत: महाराष्ट्रांमध्ये कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे या राज्यात लॉकडाऊन केले जाण्याची दाट शक्यता आहे. असे असताना तेलंगणा सरकारने राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करणार नसल्याचं स्पष्ट केलंय, त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सुटकेशा निश्वास सोडला आहे. जगभर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी तेलंगणमध्ये पुन्हा लॉकडाउन जाहीर केले जाणार नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.*

*👉विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत त्यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट गंभीर बनू नये म्हणून सरकारने खासगी आणि सरकारी शैक्षणिक संस्था यापूर्वीच बंद ठेवल्या आहेत. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेशिवाय निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनामुळे सरकारचा एक लाख कोटी रुपयांचा महसूल व इतर उत्पन्न बुडाल्याची माहिती त्यांनी दिली. चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांनी आपली भेट घेऊन लॉकडाउनबाबत विचारणा केल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, निर्मात्यांनी चित्रपटांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. प्रदर्शनाचा निम्मा टप्पा पूर्ण झाला आहे. नव्याने लॉकडाउन लागू झाल्यास उत्पन्न आणखी घटण्यास ते कारणीभूत ठरेल अशी चिंता व्यक्त करण्यात आली.*

*👉चाचण्यांच्या माध्यमातून रुग्णालयांमधील सेवा सुधारण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. लसीकरणही सुरु आहे. केंद्राने सर्व राज्यांना गरजेनुसार समान प्रमाणात लशीचा पुरवठा केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. नागरीकांना लस टोचून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन न करण्याचा निर्णय अनेकांना पटल्याचं दिसून येतोय.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!