गोवा आणि महाराष्ट्रासाठी महत्वाच्या तिलारी प्रकल्पासाठी ३३० कोटी रुपये मंजूर,*
शिंदे- फडणवीस सरकारचा निर्णय*


*मुंबई:-तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प नियंत्रण मंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज मान्यता देण्यात आली आहे.*

*👉🟥🟥👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडली.*

*👉🛑🛑👉तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प नियंत्रण मंडळाच्या बैठकीतील निर्णय :-*

*🔺🔺तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांची कामे ३० ते ३५ वर्षापुर्वी झाली आहेत. त्यामुळे जीर्ण झालेल्या आणि गळती होणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत बैठकीत एकमत झाले. त्यासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.*

*🔺🔺सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त २२ प्रकल्पबाधितांना नुकसान भरपाई देण्याचाही निर्णय घेण्यात आला.*

*🔺🔺गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव दिला, त्यावर धरणाचा सर्वंकष अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.*

*🔺🔺गोव्यातील अभियंत्यांच्या क्षमता बांधणीसाठी महाराष्ट्राकडून सहकार्य करण्याचे मान्य करण्यात आले.*

*🔺🔺तिलारी प्रकल्पाच्या ठिकाणी कालवे पुनरूज्जीवन आणि संनियंत्रणाच्या दृष्टीने संयुक्त कार्यालय स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!