संपादकीय,
जेनेरिक औषधांमुळे ३ हजार कोटींची बचत : केंद्रीय मंत्री सदानंद गौडा नवी दिल्ली : सर्वसामान्यांना माफक दरात औषधे उपलब्ध करून देण्याकरिता देशभरात ७ हजार ६४ प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे स्थापन केली आहेत . कोरोना काळात चालू आर्थिक वर्षात या केंद्रांतून ४८४ कोटी रुपयांच्या गुणवत्तापूर्ण जेनेरिक औषधांची विक्री केली . गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत ६० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली . सर्वसामान्य नागरिकांची त्यामुळे ३ हजार कोटींची बचत झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी गुरुवारी केला . २०१ ९ २०२० या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने जनऔषधी केंद्रांसाठी ३५.५१ कोटींचा निधी दिला होता . नागरिकांची २ हजार ६०० कोटींची बचत झाली . सरकारने खर्च केलेल्या दर एका रुपयामागे नागरिकांचे प्रत्येकी ७४ रुपये वाचले , असेही गौडा म्हणाले .
