🇮🇳🇮🇳
१५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपले बलिदान दिले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष पूर्ण होऊन या १५ ऑगस्ट पासून आपण स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत ह्या निमित्त प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन च्या वतीने शिरूर येथील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पेढे व रोपेवाटुन करण्यात आला. याप्रसंगी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन चे युवा प्रदेश अध्यक्ष प्रितेश गादिया,सागर कुलकर्णी,विजयनरके,वज्रदेही मिसाळ,करण खांडरे, रेश्माताई शेख,रेश्मीताई क्षीरसागर, तृप्तीताई पंचभाई, वैशाली ठुबे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.