img 20230820 wa0043
समाज परिवर्तन घडविण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने श्री उदय सदाशिव देशपांडे , श्री विलास नामदेव भोसले, श्री सोमनाथ पांडुरंग माने व श्री बाळू गणपत बोराटे या चौघांनी मिळून चेतना फाउंडेशन ची स्थापना 2019 साली सुरू केली. सरडेवाडी या परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या हेतूने १ जून २०२३ रोजी चेतना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ची स्थापना करण्यात आली या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्ले ग्रुप ते ४ थी, ५ वी ते १० वी सेमी इंग्रजी वर्ग, ११ वी व १२ वी विज्ञान , वाणिज्य , कला महाविद्यालयाची स्थापना केली . तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची सोय व्हावी म्हणून चेतना इंटरनॅशनल स्कूल ची स्थापना करण्यात आली आहे .

ग्रामीण भागातील पालकांचे दूरवर मुलींना शिक्षणासाठी पाठवण्याची मानसिक तयारी नसते त्यामुळे मुलींचे पुढील शिक्षणापासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्यासाठी चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चालू करण्यात आले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची सोय ग्रामीण भागात होईल .
आमच्याकडे येणारा विद्यार्थी हा आमचा आत्मा आहे हे लक्षात घेऊन त्याची बौद्धिक , शारीरिक असा असे सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवणारे अभ्यास विषय तज्ञ प्राध्यापक वर्गांची फळी सज्ज आहे त्यांच्याच अनुभवी मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात आमचे विद्यार्थी गरुड झेप घेतील
प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ यांच्या आयोजन केले जाणार आहे

अकरावी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
१)दहावीचे गुणपत्रकाची झेरॉक्स
२)शाळा सोडल्याचा मूळ दाखला
३)आधार कार्ड
४)पासपोर्ट साईचे दोन फोटो
अकरावी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी
खालील विषयाची सोय
१) मराठी, इंग्रजी , फिजिक्स , केमिस्ट्री , बायोलॉजी , भूगोल .( B – Group)
२)मराठी, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, भूगोल.(A- Group)
३)मराठी, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स( AB-Group)
शिस्त
१)महाविद्यालयाच्या आवारात धूम्रपानास सक्त मनाई आहे
२)महाविद्यालयामध्ये मोबाईल वापरण्यास पूर्ण बंदी आहे
३)विद्यार्थिनीची गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यास विद्यालयातून काढून टाकून पोलीस कारवाई केली जाईल
४) महाविद्यालयात कोणत्याही प्रकारची निवडणूक घेतली जाणार नाही व विनापरवानगी सहलीचे आयोजित केले जाणार नाहीत
५) महाविद्यालयाच्या कोणत्याही मालमत्तेची मोडतोड अगर नुकसान केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल
६)महाविद्यालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचना वाचाव्यात न वाचल्यास होणाऱ्या नुकसानीस विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील तसेच सूचनाचे ते पालन करतील
७)नियमात बदल करण्याची व आवश्यकते नवीन नियम तयार करण्याचे सर्व अधिकार संस्थेला आहेत

महाविद्यालयाचे ठळक वैशिष्ट्ये
१)तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग
२)सुसज्ज प्रयोगशाळा
३)संपूर्ण विद्यालय परिसर सीसीटीव्ही कॅमेरे च्या कक्षेत
४)स्वच्छ व सुंदर परिसर
५)अभ्यसांतर्गत सहलीचे आयोजन
६)विद्यार्थी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन
७)सुसज्ज इमारत व खेळाचे मैदान
८)विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!