शॉर्टकटसाठी बस ‘नो एन्ट्री’मध्ये शिरली अन् 13 कुटुंब दु:खात बुडाले;
शॉर्टकटसाठी बस ‘नो एन्ट्री’मध्ये शिरली,👉🟥🟥👉अन् 13 कुटुंब दु:खात बुडाले;*
*👉🟪🟪👉अपघातग्रस्त जागेचा इतिहासही भयानक*
*👉🟪🟪👉जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन मुंबईकडे निघालेल्या गोरेगाव येथील बाजी प्रभू झांज पथकाच्या बसने घेतलेला एक शॉर्टकट 13 जणांच्या जीवावर बेतला आहेत.तर 28 जणांना आयुष्यभर विसरता येणार नाही अशी कटू आठवण देऊन गेला आहे. ड्रायव्हरने शॉर्ट कटचा मोह टाळला असता तर बसने पुण्याहून निघालेले सर्व 41 जण सुखरुप घरी पोहोचले असते.*
*👉🟥🟥👉रेस्क्यू टीममध्ये एका सदस्यांना दिलेल्या माहितीनुसार, या बसचा जिथे अपघात झाला खरंतरी येथे वाहनांना नो एन्ट्री आहे. कोणत्याही वाहनांना येण्यासाठी जाण्यासाठीचा हा रस्ता नाही. परंतु शॉर्टकट आणि लवकर पोहोचण्यासाठी अनेकजण या मार्गाचा वापर करतात.बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळील हा रस्ता अतिशय तीव्र वळणांचा असल्याने याठिकाणी अपघातांचं प्रमाण अधिक आहे. म्हणूनच हा रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र या बसच्या ड्रायव्हरने खुप धोका पत्करुन या ठिकाणी गाडी आणली आणि अपघात झाला. याच ठिकाणी याआधीही पाच ते सहा अपघात झाले आहेत, त्यापैकी हा सर्वात भीषण अपघात आहे, असंही बचाव पथकातील सदस्यांनी सांगितलं.*
*👉🔴🔴👉अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 28 जण जखमी आहे. मुंबईतील गोरेगाव येथील बाजी प्रभू वादक गट (झांज पथक) पुण्याचा कार्यक्रम संपवून माघारी येत असताना हा अपघात झाला.अपघातील एकूण 13 पैकी 12 मृतांची ओळख पटली आहे. तर एकाची ओखळ पटलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.*
*👉🟣🟣👉मृतांची नाव*
जुई दिपक सावंत (वय 15 वर्ष रा. गोरेगाव)
यश सुभाष यादव (वय 18 वर्ष रा. मुंबई)
स्वप्निल धुमाळ (वय 18 ते 20 रा. मुंबई)
वीर कमलेश मांडवकर (वय 8 रा. गोरेगाव)
वैभवी साबळे (वय 16 वर्ष रा. गोरेगाव)
सतिष धुमाळ (वय 20 रा. गोरेगाव)
मनिष राठोड (वय 23 रा. चेंबर)
हर्षदा परदेशी (वय 19-20 रा. माहिम)
अभय विजय साबळे (वय 20 वर्ष रा. मालाड)
हरीरतन यादव (वय 40 वर्ष रा. जोगेश्वरी)
कृतिक रोहित (गोरेगाव)
राहुल गोठण, वय १७ (गोरेगाव)
*👉🟥🟥👉अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. स्वप्नील श्रीधर धुमाळ वय १६ वर्ष, सतिश श्रीधर धुमाळ, वय २५ वर्ष अशी त्यांची नावे आहेत.याशिवाय अपघातात जुई दिपक सावंत, वय १८ वर्ष, यश सुभाष यादव, कुमार वीर कमलेश मांडवकर, वय ८ वर्ष, कुमारी वैभवी साबळे, वय १५ वर्ष यांचाही मृत्यू झाला.मनीष राठोड, वय २५ वर्ष, कृतिक लोहित, वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई, राहुल गोठण, वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.*